Keshav Mulay MNS Adhikrut Mumbadevi Vidhansabha
Social Service
#भगतसिंह की बैरक की साफ-सफाई करने वाले का नाम बोघा था। भगत सिंह उसको बेबे (मां) कहकर बुलाते थे। जब कोई पूछता कि भगत सिंह ये बोघा तेरी बेबे कैसे हुआ? तब भगत सिंह कहते, मेरा मल-मूत्र या तो मेरी बेबे ने उठाया, या इस भले पुरूष बोघे ने। बोघे में मैं अपनी बेबे (मां) देखता हूं। ये मेरी बेबे ही है।
यह कहकर भगत सिंह बोघे को अपनी बाहों में भर लेता।
भगत सिंह जी अक्सर बोघा से कहते, बेबे मैं तेरे हाथों की रोटी खाना चाहता हूँ। पर बोघा अपनी जाति को याद करके झिझक जाता और कहता, भगत सिंह तू ऊँची जात का सरदार, और मैं एक अदना सा भंगी, भगतां तू रहने दे, ज़िद न कर।
सरदार भगत सिंह भी अपनी ज़िद के पक्के थे, फांसी से कुछ दिन पहले जिद करके उन्होंने बोघे को कहा बेबे अब तो हम चंद दिन के मेहमान हैं, अब तो इच्छा पूरी कर दे!
बोघे की आँखों में आंसू बह चले। रोते-रोते उसने खुद अपने हाथों से उस वीर शहीद ए आजम के लिए रोटिया बनाई, और अपने हाथों से ही खिलाई। भगत सिह के मुंह में रोटी का गास डालते ही बोघे की रुलाई फूट पड़ी। ओए भगतां, ओए मेरे शेरा, धन्य है तेरी मां, जिसने तुझे जन्म दिया। भगत सिंह ने बोघे को अपनी बाहों में भर लिया।
ऐसी सोच के मालिक थे अपने वीर सरदार भगत सिंह जी...। परन्तु आजादी के 76 साल बाद भी हम समाज में व्याप्त ऊँच-नीच के भेद-भाव की भावना को दूर करने के लिये वो न कर पाए जो 95 साल पहले भगत सिंह ने किया।
#स्वातंत्रदिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा ..
महान शहीदे आजम को इस देश का सलाम।
मनसे अध्यक्ष श्री.राज साहेब ठाकरे यांच्या विनंतीला मान देऊन दहावी बोर्डाने परीक्षेची वेळ दहा मिनिटे वाढवून दिली. याचा फायदा महाराष्ट्रातील १५ लाख विद्यार्थ्यांना झाला. आज दहावीत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थी व पालकांनी श्री.राजसाहेब ठाकरे यांची शिवतीर्थ या निवास्थानी आज भेट घेऊन आभार मानले...
MNS Adhikrut MNS शिवतीर्थ - मराठी माणसाचे न्यायालय
#महाराष्ट्रसैनिक
Keshav Mulay MNS Adhikrut Mumbadevi Vidhansabha
आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे!
#मराठवाडा_मुक्तीसंग्राम_दिन #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रधर्म
RAJ THAKARE Bala Nandgaonkar MNS Adhikrut TV9 Marathi
‘शिवछत्रपतींचा छावा’
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी निर्माण केलेले हे लोकल्याणकारी राज्य टिकवण्यासाठी छत्रपती शंभुराजांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांना संस्कृत भाषा सुद्धा अवगत होती. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी ‘बुध्दभूषण’ हा ग्रंथ लिहिणारे संभाजी महाराज जेवढे पराक्रमी योद्धा होते तेवढ्याच अचाट बुद्धिमत्तेचे विद्वानसुद्धा होते.
युगधुरंदर स्वराज्यरक्षक अजिंक्ययोद्धा ‘धर्मवीर’ छत्रपती संभाजी महाराज ह्यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा !
#माझाकट्टा
नव्या पर्वाची दमदार सुरवात!
पाहा महाकट्टा 30 एप्रिल आणि 1 मे रोजी दिवसभर!
ABP Majha
Keshav Mulay
आपल्या हाताने मुंबईची घाण दररोज उचलून हे शहर स्वच्छ करणाऱ्या आमच्या सफाई कामगारांना मुंबईत स्वतःचे हक्काचे घर नाही. घरांसाठी ते वर्षानुवर्षं न्यायालयात चपला झिजवताहेत. मुंबई सुरक्षित ठेवणारे आमचे पोलीस बांधव-भगिनी दररोज पालघर/ वांगणी/ कामोठे येथून ये-जा करतात. या शहरात सामान्यांच्या खिशाला परवडणारी घरं बांधण्याचं साधं धोरण सरकार आखत नाही. बिल्डरांच्या नफेखोरीवर वचक नाही. मात्र, जनतेकडून वसूल केलेल्या करांतून भरलेली सरकारी तिजोरी आपल्या हातचलाखीने 'साफ' करणाऱ्या सर्वपक्षीय आमदारांना उद्धव ठाकरे घरं देणार!
उद्या आमदारांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च भागवणारी योजनाही उद्धव ठाकरे आणतील.
स्वतःच्या हक्काच्या घरापासून वंचित असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळून उद्धव ठाकरे नेमकं काय साध्य करू पाहताहेत? मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आणखी काही दिवस टिकावी यासाठी सर्वपक्षीय आमदारांचा पाठींबा!?
: कीर्तिकुमार शिंदे
Kirtikumar Shinde MNS
महाराष्ट्र नवनिर्माण सेना #मुंबादेवी_विधानसभा
आपली हक्काची निशाणी #रेल्वे_इंजिन !!
लक्षात ठेवा....✌️
#मनसे #राजसाहेबठाकरे #अमितसाहेबठाकरे
बहुजनांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणारे द्रष्टे समाजसुधारक, सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण घालून देणारे शासनकर्ते, राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन.
लसीकरण आहे पण लस नाही. खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोक आहेत पण नोकरी नाही, मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळंच रामभरोसे आहे पण त्यात काहीच राम नाही.
#मराठी #मनसे
🛑
Sandip Deshpande मनसे , सरचिटणीस.
#विचार_महाराष्ट्र_धर्माचा_निर्धार_हिंदवी_स्वराज्याचा
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना जन्मोत्सवा निमित्त मानाचा मुजरा.
वन अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी प्रशासनातील जे कोणी या आत्महत्येमागे आहेत त्यांच्यावर कठोर अशी कारवाई मुख्यमंत्री ह्यांनी करावी.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दीपाली चव्हाण ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
सौ.रिटा गुप्ता.
सरचिटणीस । महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Rita Gupta ताई
८ मार्च, आज जागतिक महिला दिन. मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा हे मला समजत नाही.
आमचे आजोबा, प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, "बांधवांनो, महिलांबद्दल जितका-जितका आदर तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवत जाल, वाढवत जाल तितके शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होतील" त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी ३६५ दिवस साजरी व्हायला हवी तसंच महिलांचा म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या जगतनियंत्याचा सन्मान ३६५ दिवस साजरा झाला पाहिजे. असो.
मी मागे एकदा एका भाषणात माता-भगिनींना उद्देशून जे बोललो होतो ते आज पुन्हा सांगतो; तुम्हाला कोणी सक्षम करण्याची गरज नाही तुम्ही स्वतः सक्षमच आहात. तुम्ही तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि दुसऱ्या स्त्रीचं दुःख आपलं मानून कृती करू लागलात तर जगात कुठल्याच स्त्रीवर अन्याय होऊ शकणार नाही.
राजकारणात किंवा समाजकारणात कार्यरत असणाऱ्या महिलांनाही माझं आवर्जून सांगणं आहे तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही, तुम्ही थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हा, तुम्हाला अपेक्षित बदल तुम्हीच घडवू शकता आणि जग बदलवू शकता.
बाकी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा.
आपला नम्र,
राज ठाकरे
#महिलादिन
#जागतिक_महिला_दिन
#महाराष्ट्राचे_रत्न #मराठी_बाणा
सर्व क्षेत्रात स्व-कर्तृत्वाची मोहोर उमटवणाऱ्या रत्नांनी, मराठी स्वाक्षरीची मोहोर देखील कायम उमटवली. त्यातल्या काही स्वाक्षऱ्या,स्वाक्षरी संग्राहक श्री.सतीश चाफेकर ह्यांच्या संग्रहातून घेऊन ही चित्रफीत केली आहे. तुम्हाला मराठी स्वाक्षरी सुरु करायला ही प्रेरणा.
#मराठीराजभाषादिन #मायमराठी #महाराष्ट्रधर्म
सरकारने माघार घेऊ नये !
'अंमलबजावणीच्या बाबतीत काही सुधारणा करता येतील. परंतु आज माघार घेतली तर देशातील एकूण आर्थिक सुधारणांबाबत आपण दहा वर्ष मागे जाऊ'
| | #मनसे
राज सरकार @ Anil Shidore-राज समर्थक
विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
●●● महात्मा ज्योतिबा फुले....
थोर समाजसुधारक , स्त्री शिक्षणाचे प्रणिते,लेखक , शिक्षक , #क्रांतिसूर्य_महात्मा_ज्योतिबा_फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..💐
#विजयादशमी #दसरा #मुंबादेवी_विधानसभा
◆ #महाराष्ट्रावर_ओढावणार्या_संकटातून_जनतेची_रक्षा_ #करणारे_एकमेव_ब्रम्हास्त्र_सन्मा_राजसाहेब_ठाकरे_आणि_मनसे◆
हे #मुंबादेवी #माते महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आमच्या राजसाहेबांना प्रचंड शक्तीदे हीच प्रार्थना...🙏🏻
#तमाम_जनतेला_विजयादशमीच्या_मनःपूर्वक #शुभेच्छा..💐
शुभेच्छूक: केशव रमेश मुळे (विभागअध्यक्ष)
#मुंबादेवी_विधानसभा
महिला बचत गटातील महिलांचे सर्व कर्ज माफ करावं, बचतगटातील महिलांना मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून होत असलेल्या दंडेलशाहीविरुद्ध कठोर पावलं उचलावीत ह्यासाठी आज मनसे नेते श्री.बाळा नांदगावकर, सरचिटणीस, सरचिटणीस सौ.रिटा गुप्ता, सौ.शालिनी ठाकरे सहकार सेनेचे अध्यक्ष श्री.दिलीप धोत्रे, सहकार सेनेच्या सरचिटणीस सौ.अनिषा माजगावकर ह्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री श्री.अजित पवार ह्यांची भेट घेतली. चर्चेअंती ह्या दोन्ही मागण्यांवर अर्थमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली व लवकरात लवकरात कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. #मनसेदणका
Bala Nandgaonkar Ajit Pawar Rita Gupta Shalini Thackeray Dilip Dhotre
१४ ऑक्टोबर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस व मनसे प्रतिरुप मंत्री मंडळ (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग) #सन्मा_रिटाताई_गुप्ता यांना वाढदिवसांच्या मनःपूर्वक शुभेच्छा...💐🎂
आपणांस निरोगी व उदंड आयुष्य लाभो हिच मुंबादेवी माते चरणी प्रार्थना.
शुभेच्छूक ::
केशव मुळे (विभागअध्यक्ष)
आणि समस्त मुंबादेवी विधानसभा महाराष्ट्र सैनिक
Rita Gupta ताई
#महाराष्ट्रसैनिकांचीमाऊली
#लढाकोरोनाशी
https://twitter.com/BalaNandgaonkar/status/1313475608278597636?s=20
राज्यभर शेकडो नागरिकांना "रेमडेसिव्हिर" साठी पूर्ण दिवस रांगेत थांबून ही अनेकदा मिळत नाही व अनेक ठिकाणी त्याचा काळाबाजार चालला आहे तर दुसरीकडे अनेक देशांना आपण त्याचा पुरवठा करीत आहोत. विदेश नीतीचा भाग म्हणून हे करणे मान्य असले तरी पहिले आपल्या नागरिकांना ते उपलब्ध करून देणे हीच आपली प्राथमिकता असायला हवी.ज्या तत्परतेने कांदा निर्यातीवर बंदी घातली तसे या बाबत ही करता येईल का याची चाचपणी करायला हवी.
Bala Nandgaonkar साहेब
Bala Nandgaonkar on Twitter “राज्यभर शेकडो नागरिकांना "रेमडेसिव्हिर" साठी पूर्ण दिवस रांगेत थांबून ही अनेकदा मिळत नाही व अनेक ठिकाणी त्याचा .....
#सरकार_राज
#सक्षम_प्रतिरूप_मंत्रिमंडळ (मनसे)
समस्या घेऊन 'कृष्णकुंज' वरच गर्दी का होतेय??
TV9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट..
व्हिडिओ साभार :- TV9 मराठी
Rita Gupta
#सविनयकायदेभंग
#सर्वसामान्य_जनतेची_मनसे #आदेश_राजसाहेबांचा
आज #मनसे_मुंबादेवी_विधानसभेच्यावतीने मुंबईतील नागरिकांसाठी व चाकरमाण्यांसाठी त्वरीत लोकल सेवा सुरु करावी यासाठी #सविनय_कायदेभंग , बंधन झुगारून ग्रांटरोड ते मुंबई सेंट्रल लोकल ट्रेन प्रवास करून आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन विभाग अध्यक्ष केशव मुळे यांच्या नेतृत्वाखाली उपविभाग अध्यक्ष विनोद आरगिले , अनिल नागरे , शाखाअध्यक्ष सतिश लाड , राजेश बनसोडे , विध्यार्थी सचिव विजय म्हात्रे , उपशाखा अध्यक्ष लक्मिकांत म्याकल , प्रकाश राउंदळ , नवनाथ केळगंद्रे यांच्या सहभागाने पारपडले..यावेळी जोरदार घोषणाबाजी करून महाराष्ट्र सरकारचा धिक्कार करण्यात आला...
वृत्तांकन : दिनेश चिलप मराठे. (महाराष्ट्र समाचार)
Sharmila Thackeray (वहिनी साहेब)
Amit Thackeray (साहेब) राज सरकार
Bala Nandgaonkar (साहेब)
Rita Gupta(ताई) Arvind Gawde (साहेब)
Sandip Deshpande (साहेब)
आपले नम्र::
#केशव_मुळे (विभागअध्यक्ष)
#विनोद_अरगीले (उपविभागाध्यक्ष)
#अनिल_नागरे (उपविभागाध्यक्ष)
*अभिमानाने सांगा की माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काय केले ते !🙏
"छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देणे ही मदत नव्हे, तर कर्तव्य!" - #मनसे_आमदार_राजूदादा_पाटील
सुशांतसिंग राजपूत, कंगना, मराठी अस्मिता...खूप काही चाललंय...🤔
राजकारण्यांना 🤑" #खाद्य"🤑 दिलं जातंय(की तेच तयार करताय)
मीडियाला TRP मिळतोय...😏
"पण ज्यांनी 🚩 #मराठीलोकांमधीलमेलेलीमराठीबाबतचीअस्मिताजागीकेली🚩 ती व्यक्ती मात्र शांत आहे...अर्थातच सन्माननीय 👑 #राजसाहेब👑
TRP असुन देखील विषयावर एक प्रतिक्रिया नाही?
कारण हा माणूस " ाजकारण" करतो...
आज पर्यंत उचललेले विषय, आंदोलने बघा...लोकांशी निगडित...उगाच खाद्य मिळालं म्हणून राजकारण करत नाही...❌
कोणत्या " #विषयालाकितीमहत्वद्यायचं" हे यांच्या पेक्षा जास्त " #कोणत्यानेत्यालाकळतअसेल" असं वाटतं नाही...आज मंदिरांचे पुजारी, जिमचे मालक-ट्रेनर, उद्योजक, विद्यार्थी, वाढीव बिलामुळे त्रस्त जनता न्याय मागायला कुठे जाते तर 🏡 #कृष्णकुंजवर🏡
आणि राज साहेब या सगळ्यांना न्याय मिळवून देताय तेही TRP चा विचार न करता...💯✔
झालं तेव्हा कसं करणार, काय या वर भाष्य करणारे पहिले कोण तर फक्त👉 राजसाहेब...
"आपल्याला " #कोरोनाबरोबरचजगावंलागेल" हे सांगणारे पहिले 👉राजसाहेबच!
हा माणूस वेगळा आहे...इतर राजकारण्यांपेक्षा! त्यांना जातीय राजकारण जमत नाही...❌
त्यांना 🤬" #नगरसेवक- #आमदारफोडाफोडीचेराजकारण"🤬 जमत नाही....राजसाहेबांना " #विकासाचे राजकारणच" कळतं आणि त्यांचे " #व्हिजन" त्यांच्या बोलण्यातून नेहमी दिसतं...💯✔
आज साहेबांचं महाराष्ट्र, त्याचे प्रश्न याबाबत जितका 🧐अभ्यास आहे तो " #क्वचितच_नेत्यांचा" असेल...
असे कोणतेच क्षेत्र नसेल ज्याबाबत साहेबांना माहिती नाही...
आजच्या सगळ्या घटना बघितल्यावर अभिमान वाटतो मी राज साहेबांच्या मनसे परिवारातील एक घटक आहे...😍
लोकांना आज नाही तर उद्या 💖 #राजसाहेब💖 कळतीलच...तो पर्यंत लढते रहो....बढते रहो...🔥
©️ॲड सागर देवरे
Raj Thackeray
#महत्वाचं
मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे, मनसे नेते श्री. अमित ठाकरे, सौ. शर्मिला राज ठाकरे, कु. उर्वशी राज ठाकरे ह्यांच्या नावाचा गैरवापर करून फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर समाजमाध्यमांमार्फत समाजात गैरसमज व खोटी माहिती पसरवणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे नोंदवण्यात यावेत. #मनसेदणका
'राज' कारणात भगव्या वादळाची चाहूल ?
संभाजीनगर मध्ये कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि जनमानसात वावर असणाऱ्या शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांनी मनसे मध्ये प्रवेश केला. खरतर गेल्या काही महिन्यांपासून संभाजीनगर मध्ये मनसे ज्या पद्धतीने काम करतीये, राज्याच्या राजकीय पटलावर मनसे ज्या प्रकारच्या भूमिका घेतेय ते पाहिलं तर आजचा प्रवेश हा फक्त ट्रेलर च आहे आणि खरा चित्रपट किती मोठा हिट ठरेल हे सांगण्याची आवश्यकता राहिलेली नाही.
संभाजीनगर म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. अगदी बाळासाहेबांच्या काळापासून संभाजीनगर च्या जनतेने सेनेला कायम आधार दिला ताकद दिली.आणि त्यामागे असणारी कारणे देखील तशीच होती. म्हणजे संभाजीनगर मध्ये ज्या पद्धतीने धार्मिक राजकारण चालते त्या पातळीवर हिंदुत्ववादी म्हणून तेथील जनतेने कायम शिवसेनेला ताकद दिली. त्यात सत्ता आल्यानंतर औरंगाबाद चे नाव बदलून संभाजीनगर करू इथपर्यंत आश्वासन शिवसेना देत राहिली.
परंतु राज्याची संपूर्ण सत्ता ताब्यात येऊन देखील शिवसेना ज्या पद्धतीने आपल्या मूळ आश्वासांनावर भूमिका बदलते आहे त्या पाहता आज ना उद्या ही वेळ येणारच होती.मुळात शिवसेनेची ही पोकळी भाजप भरून काढेल अशी अनेक लोक अटकळ बांधत होते परंतु या संपूर्ण घडामोडीमध्ये राजसाहेबांच्या मनसेने ज्या वेगात आणि जोशात उडी घेतलीय ती पाहून सर्वच राजकीय पक्ष अचंबित झाले आहेत. खुद्द भाजपचे अनेक नेते सुद्धा राजसाहेब आणि मनसेबाबत जास्तच अनुकूलता दाखविताना दिसत आहेत.
येणारा काळ पाहता पुढच्या 2 वर्षांत संभाजीनगर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे ,नाशिक,पुणे या मोठ्या महानगराच्या निवडणूका लागतील आणि त्या धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सुरू असलेल इनकमिंग हे भल्याभल्यांना धडकी भरवणारे आहे. खासकरून हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून जे शिवसैनिक नाराज आहेत ते आपला पहिला आधार म्हणून मनसेकडून पाहत आहेत.आज मुंबई, ठाणे ,कल्याण डोंबिवली मध्ये शिवसेना सत्तेवर आहे,नाशिक आणि नवी मुंबई मध्ये शिवसेना मोठा विरोधी पक्ष आहे. मग जर अशाच पद्धतीने शिवसैनिकांचे मनसेमध्ये इनकमिंग सुरू राहीले तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसे मोठं रान मारणार यात काडीचीही शंका नाही.
'बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे आजची राजसाहेबांची मनसे' ही भावना आज शिवसैनीकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. आपल्या न्याय्य भूमिकांमध्ये जी निर्भीडता असावी लागते ,बाळासाहेब ज्या प्रखरतेने आपली भूमिका मांडत होते त्या भूमिकेवर ठाम राहत होते, 'हिंदूंनो गांडू राहिलात तर दांडू जाईल' अशी उघड भूमिका घेण्याचं धाडस बाळासाहेबांमध्ये होते म्हणून जनता बाळासाहेब यांना मानत होती आणि अगदी तोच स्वभाव आणि काम करण्याची तीच स्टाईल राजसाहेब यांच्यामध्ये आहे आणि त्याच्याच जोडीला मुंबई मध्ये संदीप देशपांडे,ठाण्यामध्ये अविनाश जाधव,नवी मुंबई मध्ये गजानन काळे,पुण्यात वसंत मोरे,रुपाली ठोंबरे,संभाजीनगर मध्ये सुहास दशरथे हे सरदार आपल्या मावळयांसोबत महानगरपालिका क्षेत्रात ज्या तळमळीने काम करत आहेत ते पाहता येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकांमध्ये राज साहेबांची मनसे बाजी मारणार यात अजिबात शंका नाही.
जय महाराष्ट्र - ©️ महाराष्ट्र सैनिक विक्रमसिंह पवार
| #मनसे
दिनांक-२४/८/२० रोजी #मुंबादेवी_विधानसभेतील ग्रँट रोड व मुंबई सेंट्रल येथील गणेशोत्सव मंडळास #मनसे_सरचिटणीस व #प्रतिरूप_मंत्रिमंडळ_आरोग्य व #कुटुंब_कल्याण_विभाग #सौ_रीटाताई_गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत सॅनिटायझर स्टॅन्ड भेट दिले...
सदर प्रसंगी मुंबादेवी विधानसभा विभाग अध्यक्ष श्री. केशव मुळे, मलाबारहिल विधानसभा विभाग अध्यक्ष श्री. धनराज नाईक, उपविभाग अध्यक्ष विनोद अरगिले, महिला उपविभाग अध्यक्षा सौ. उर्मिला साखरकर, शाखाअध्यक्ष - सतिश लाड, राजेश बनसोडे तसेच मुंबादेवी व मलबारहिल विधानसभेचे महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
सदर उपक्रमाचे आयोजन अनिल नागरे (उपविभागअध्यक्ष) व सचिन विचारे (शाखाअध्यक्ष) यांनी केले होते...
#महाराष्ट्राच्या राजकारणातील येणारी दोन दशकं अफाट महत्वाची असतील.येणारा काळ हा भीषण असेलं.महाराष्ट्र सांभाळणारे नेते आता बोटावरती मोजण्याइतके उरलेतं.बाळासाहेब , गोपीनाथ मुंडे साहेब , प्रमोदजी महाजन साहेब,विलासराव देशमुख साहेब,आबासाहेब असे केंद्रात दबदबा असणारे नेते आपल्या पिढीने डोळ्यांदेखत गमावलेले आहेतं.उद्या राजकीय क्षेत्रातलं महाराष्ट्राचं स्वतंत्र अस्तित्व टिकवुन ठेवायचं असेलं तर,आम्हाला हाचं एकमेव माणुस ताकदीचा दिसतो.ज्या ताकदीनं शंकरराव चव्हाणापासुन आदरणीय बाळासाहेबां सारख्यांनी हा महाराष्ट्र तयार केला होता.त्यांच्याचं तालमीमध्ये तयार झालेला हा एक शेवटचा हिरा..!
#राज_श्रीकांत_ठाकरे..!❣️
#लढा_कोरोनाशी #गणेशोत्सव आणि #महाराष्ट्र_सैनिक
महाराष्ट्र समाचार वृत्तवाहिनीवर #मनसे_सरचिटणीस व प्रतिरूप मंत्रिमंडळ आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग #सौ_रिटाताई_गुप्ता यांच्याशी रोख ठोक चर्चा....
आज दिनांक - २४/८/२० रोजी मुंबादेवी विधानसभेतील ग्रँट रोडचा राजा सा. ग. मंडळ व दुर्गादेवी व डंकनरोड सा. ग. मंडळास #मनसे_सरचिटणीस व प्रतिरूप मंत्रिमंडळ आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग #सौ_रीटाताई_गुप्ता यांनी वेळात वेळ काढून सदिच्छा भेट दिली.
सदर प्रसंगी मुंबादेवी विधानसभा विभागअध्यक्ष श्री. केशव मुळे, मलाबारहिल विधानसभा विभाग अध्यक्ष श्री. धनराज नाईक, उपविभाग अध्यक्ष श्री. अनिल नागरे, विनोद अरगिले, महिला उपविभाग अध्यक्षा सौ.उर्मिला साखरकर, शाखाअध्यक्ष सचिन विचारे, सतिश लाड, राजेश बनसोडे तसेच मुंबादेवी व मलबारहिल विधानसभेचे महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
#हिंदू_सण_आणि_मनसे
दैनंदिन आयुष्य जगत असताना आपल्या आयुष्यात आनंदाचे क्षण तसे क्वचितच येतात आणि तेही व्यवस्थित साजरे नाही करता आले किंवा त्यालाही अटी शर्ती लावल्या गेल्या तर त्या आनंदात मज्जा राहत नाही. अलीकडच्या काही वर्षांतील सरकार किंवा न्यायालयांची धोरणे पहिली तर आपल्या सणातील आनंद हिसकावून त्या सणाला बेचव शिस्त देण्याचा प्रयत्न होतोय.
परंतु अस घडत असताना या गोष्टींच्या विरोधात बोललं पाहिजे आपले सण ,उत्सव टिकले पाहिजेत यासाठी पुढाकार घेताना कोणी दिसत नाही.स्वतःला धर्माचे स्वयंघोषित मालक म्हणवून घेणारे राजकीय पक्ष देखील मूग गिळून गप्प असतात.
परंतु अशा ढोंगी वातावरणात एक पक्ष कायम प्रामाणिक भूमिका घेताना दिसतोय. सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि मनसेचे सर्व नेते कार्यकर्ते कायम हिंदू सण टिकले पाहिजेत यासाठी प्रयत्नशील असतात आणि वेळप्रसंगी त्यासाठी कायदेशीर तसेच रस्त्यावर सुद्धा लढायची त्यांची नेहमी तयारी असते.
दहीहंडी मधील उंचीचा प्रश्न असेल, गणेशोत्सव साजरा करायला जाणाऱ्या कोकणी चाकरमान्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मोफत बस उपलब्ध करून देणे असो, गरीब कुटुंबांना मोफत गणेश मूर्तीचं वाटप करणे असो,लोकडोवन मंदिराची दरवाजे नियम लावून का असेना पण भाविकांना देवाच्या दर्शनासाठी खुले करावे अशी ठाम भूमिका असो राजसाहेब आणि पक्ष कायम सणांबाबत जनतेसोबत राहिला आहे. फक्त बोलल्याने कोणी हिंदू होत नाही त्यासाठी हिंदू जनतेला हिंदू म्हणून सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा लागतो आणि नेमकं तेच राजसाहेब करत आहेत. कारण धार्मिक अल्पसंख्याक म्हणून इतर धर्मियांचे लाड होत असताना देशात बहुसंख्य असणाऱ्या हिंदूंवर कोणी अन्याय करू पाहत असेल तर ते योग्य नाही. आणि त्याविरोधात ठोस भूमिका घेण्याची ताकद फक्त मनसे मध्येच आहे. आणि जोपर्यंत मनसे आहे तोपर्यंत हिंदू सणांवर कोणतीही आपत्ती येणार नाही हा विश्वास आम्हाला आहे आणि म्हणूनच आम्ही या पक्षात आहोत याचा आम्हाला अभिमान आहे.
- ©विक्रमसिंह पवार (महाराष्ट्र सैनिक ता.बार्शी.जिल्हा सोलापूर)
#मनसे | #हिंदू | |
#लोकमान्यांची यावर्षी शंभरावी पुण्यतीथी व आपण सारेजण त्यांच्या मनातील गणेशोत्सव साजरा करत आहेत. साधेपणाने.
मोठंमोठे मंडळ आरोग्यशिबीरं भरवून देशकार्य करत आहेत.
डीजे चा गोंधळ नाही का सणाचे बाजारीकरण नाही. पुर्ण पावित्र्यात साजरा होत आहे आपला सण.!
आज कुंभारवाडा येथील #दुर्गादेवी_व_डंकन_रोड सार्वजनिक उत्सव मंडळ आणि #श्रीमंत_योगी_प्रतिष्ठान यांनी #रक्तदान_शिबिर आणि #अवयवदान_शिबिराच यशस्वी आयोजन केले होते. त्यांच्या या अभिनव उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी मनसे मुंबादेवी टीमने आज भेट दिली. माझ्या सोबत राजेश बनसोडे (शाखाअध्यक्ष), विजय म्हात्रे (विद्यार्थी सचिव), आशिष मयेकर (उपशाखाअध्यक्ष), प्रशांत ताकवले, ओमकार लाड (गटाअध्यक्ष)उपस्थित होते.
#मी_स्वतः_याच_मंडळाचा_कार्यकर्ता_असल्याचा_आज_सार्थ_अभिमान_वाटला.
● #गणपती_बाप्पा_मोरया●
आपला नम्र::
केशव_रमेश_मुळे (विभागअध्यक्ष)
मुंबादेवी विधानसभा
#महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना
#मुंबादेवी_विधानसभा
आज मुंबादेवी विधानसभा अंतर्गत महानगर पालिकेमार्फत कुंभारवाडा, कामाठीपुरा व मुंबई सेंट्रल येथे बांधण्यात आलेल्या कृत्रिम तलावाची पाहणी विभाग अध्यक्ष केशव मुळे व मनवासे उपाध्यक्ष प्रशांत गांधी यांच्या मार्फत करण्यात आली.
गणेश विसर्जना दरम्यान येणाऱ्या त्रुटी तसेच गणेश मूर्तींचे सुखरूप रित्या विसर्जन करताना श्रींच्यामूर्तीचा अवमान होणार नाही अशाप्रकारच्या सूचना महानगरपालिका अधिकारी व कंत्राटदार यांना देण्यात आल्या.
सदर वेळी उपविभाग अध्यक्ष विनोद अरगिले, अनिल नागरे, शाखा अध्यक्ष सतीश लाड, सचिन विचारे, राजेश बनसोडे ,उपशाखाध्यक्ष अभिजित मांडवे, आशिष मयेकर, वैभव राऊत, परेश मोघे व गटाध्यक्ष पंकज सांगळे उपस्थित होते.
💐सर्वांना गणेशोत्सवच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐
शुभेच्छूक:
#मनसे_मुंबादेवी_परिवार
◆ #आदेश_राजसाहेबांचा◆
#महाराष्ट्राच्या_हितासाठी_फक्त_मनसे.....
●कामाठिपुरा महापालिका शाळा झोपडपट्टीच्या विळख्यात. कोरोना महामारीच्या पाश्वभूमीवर विद्यार्थ्यानच्या आरोग्याच्या हितासाठी #सन्मा. #बाळा_नांदगावकर_साहेब (नेते) यांच्या सूचनेनुसार आणि #सन्मा. #अरविंद_गावडे_साहेब (उपाध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाने व #केशव_मुळे (वि. अध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली मनसे मुंबादेवीतील पदाधिकारी आक्रमक तीव्र आंदोलनाचा ईशारा● #मलबारहिल_विधानसभेचे #विभागअध्यक्ष_धनराज_नाईक यांनी देखील सदर आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे....
राज सरकार राजमुद्रा मनसे वृत्तांत अधिकृत
Amit Thackeray saheb
Sharmila Thackeray वहीनी साहेब
Bala Nandgaonkar saheb
Rita Gupta tai ~ Sandeep Deshpande Adhikrut
आपले नम्र:::
#केशव_मुळे (विभागअध्यक्ष)
#विनोद_अरगिले (उपविभागअध्यक्ष)
#अनिल_नागरे (उपविभागअध्यक्ष)
#सतिश_लाड (शाखाअध्यक्ष)
‘जेंव्हा एखादं राष्ट्र दिव्याच्या उजेडाचाच इतिहास तेव्हढा पुढे आणते आणि अंधाराबद्दल जाणूनबुजून अज्ञान दाखवते, तेंव्हा ते राष्ट्र - त्याची प्राचीन संस्कृती कितीही उज्ज्वल असो, नवीन मन्वंतराच्या प्रसादाला पात्र होणे कधीही शक्य नाही असे ठाम समजावे'
प्रबोधनकार ठाकरे
(ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास - मधून)
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना,
सस्नेह जय महाराष्ट्र.
संघर्षाची भीती मला कधीच वाटली नाही, उलट तो मला माझा सोबती वाटत आला आहे. संघर्ष आला की चढ-उतार हे येणारच. पण चढ आला म्हणून हुरळून जायचं नाही वा उतार आला म्हणून विचलित व्हायचं नाही, हे मी शिकलो. पण ह्या संघर्षात माझा एखादा सहकारी कोलमडून पडतो तेंव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरून जातं.
सुनील ईरावर ह्या आपल्या नांदेडच्या सहकाऱ्याने आत्महत्या केली आणि ती करताना त्याने लिहिलंय की 'साहेब जात आणि पैसा हे दोन्हीही माझ्याकडे नाही. त्यामुळे राजकारण करणं ह्या पुढे मला शक्य नाही. म्हणून मी माझं जीवन संपवत आहे, राजसाहेब मला माफ करा. '
अरे बाबांनो, जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण तर आपल्याला बदलायचं आहे म्हणूनच ९ मार्च २००६ ला आपण ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ हा पक्ष सुरु केला. नवनिर्माणाच्या आपल्या ह्या लढ्यात आपल्याला पैसे आणि जात ह्यांच्या दलदलीत अडकलेलं निवडणुकीचं राजकारण बदलायचं आहे आणि म्हणूनच गेले १४ वर्ष आपण हा संघर्ष करतोय. पण हा संघर्ष सोपा नाही, प्रवाहाच्या उलट पोहणाऱ्याची सगळ्यात जास्त दमछाक होते पण त्यासाठी माझी तयारी आहे आणि तुमची देखील. म्हणूनच इतक्या चढ उतारांच्या नंतर देखील तुमची आपल्या ध्येयावरची निष्ठा ढळली नाही.
मी ह्या आधी देखील सांगत आलो आहे आणि आत्ता पुन्हा सांगतो, हा या जातीचा... त्या मतदार संघात अमुक जातीची इतकी मतं आहेत... ह्या उमेदवाराकडे पैसा ओतायची इतकी ताकद आहे... असल्या गोष्टीत मला स्वारस्य नाही, मला माझ्या पक्षाचं राजकारण असल्या गोष्टींवर चालवायचं नाही, यश जेंव्हा यायचं असेल तेंव्हा येईल. त्यासाठी मी माझी तत्व सोडणार नाही आणि तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर लक्षात ठेवा त्याचा सगळ्यात जास्त त्रास मला होईल.
सुनील ईरावरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी श्रद्धांजली अर्पण करतो, आणि तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की माझ्या कुठल्याही सहकाऱ्याला अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कुटुंब आहे. त्यामुळे कधीही मन उदास झालं तर एकमेकांशी बोला, लढाई कठीण असली तरी अंतिम विजय आपलाच आहे हे विसरू नका.
कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती कठीण आहे, ह्या काळात स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबीयांची काळजी घ्या.
आपला नम्र,
राज ठाकरे.
#महाराष्ट्रसैनिक #महाराष्ट्रनवनिर्माणसेना #नवनिर्माण #संघर्ष
#आम्ही_मनसे_होतकरू_तरुणांसोबत...
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबादेवी विधानसभा येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कामाठीपुरा येथे मनसे पदाधिकारी राजेश अरगिले आणि प्रकाश रौदळ यांनी थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत ताजा भाजीपाला विक्री व्यवसाय सुरू केला तसेच इस्लामपूरा येथे मनसे समर्थक प्रकाश नाईकवाडे आणि अरुण जांभळे यांनी सातारी स्पेशल चहाचे दुकान सुरू केले.या नवीन व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आज ध्वजारोहण कार्यक्रम आटपून सदिच्छा भेट दिली.तसेच त्यांना येणाऱ्या अडचणीमध्ये पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.. सदर प्रसंगी माझ्या सोबत उपविभागाध्यक्ष अनिल नागरे, विनोद अरगिले, उपाध्यक्ष वाहतूक प्रशांत गांधी, महापालिका सहचिटणीस मनिष मारू, शाखाअध्यक्ष राजेश बनसोडे, सतिश लाड, सचिव विध्यार्थी विजय म्हात्रे आणि उपशाखाअध्यक्ष लक्ष्मीकांत म्याकल, तेजस दोडिया, गटाध्यक्ष प्रशांत ताकवले, ओमकार लाड, मोहित चौरसिया, रवी चौरसिया व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते...
सर्व नव व्यावसायिकांना मनसे शुभेच्छा....
शुभेच्छूक
केशव मुळे
विभागाअध्यक्ष
मुंबादेवी विधानसभा
#राजठाकरे #स्वातंत्र्यदिवस
https://www.facebook.com/165370377327453/posts/872120933319057/?extid=zBaQvm1oyahbFLGz&d=n
#स्वातंत्र्यदिवस
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
12, Sant Sena Maharaj Marg
Girgaon
400004