DailyNeeds

DailyNeeds

We Manufacture and sell Daily Needed Products Such as Premium Soap, Hair Oil , Toothpaste, Facewash and Shampoo

03/07/2023

* गुरुपौर्णिमा *

गुरू म्हणजे...ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा,गुरू म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य,गुरू म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती,गुरू म्हणजे विश्वास आणि वात्सल्य,गुरू म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक,आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान गुरूंना आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन...!!!
गुरू माझे दैवत...!!!

*माझ्या जीवनातील माझे गुरु आई-वडील,
माझे गुरुजन,
माझे नातेवाईक,*
*माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन व आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी, समाजातील न्यात अज्ञात व्यक्ती...*
*आपण सर्वजण मला वंदनीय व गुरुतुल्य आहात...*
*गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना वंदन व शुभेच्छा...🙏

21/04/2023

*अननस खाण्याचे 6 आयुर्वेदिक फायदे.....*

*१). वजन कमी करण्यास उपयुक्त...*
अननसात फॅटचे प्रमाण नाममात्र असते. त्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. अननसमध्ये आढळणारे घटक लठ्ठपणाविरोधी घटक म्हणून काम करतात. हे लिपोजेनेसिसची प्रक्रिया देखील नियंत्रित करतात. ज्यामुळे शरीरातील 🧍🏻‍♂️चरबीचे प्रमाण कमी होते. इतकेच नाही तर ते लिपोलिसिसच्या प्रक्रियेला गती देते. ज्यामुळे चरबी आणि इतर लिपिड अधिक त्वरीत नष्ट होतात.

*२). हृदयासाठीही फायदेशीर...*
अननसाचे नियमित सेवन करणे देखील हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे केवळ हृदयाला विविध प्रकारच्या नुकसानीपासून वाचवते असे नाही तर त्यात असलेले ब्रोमेलेन हृदयाच्या पेशींना मरण्यापासून रोखते. हे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवते. ज्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित राहते. याशिवाय, ते मृत ऊतकांचा आकार देखील कमी करते. ज्यामुळे रक्ताभिसरणात कोणताही अडथळा येत नाही.

*३) सर्दी आणि फ्लू मध्ये फायदेशीर...*
अननसमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी देखील आढळते. ज्यामुळे ते सर्दी आणि फ्लूमध्ये खूप फायदेशीर आहे. जेव्हा सर्दी असते तेव्हा श्लेष्माचा पडदा अनेकदा फुगतो आणि जास्त श्लेष्मा जमा होऊ लागतो. अननसमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतात.

*४) रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त...*
अननसमध्ये व्हिटॅमिन सी, मॅंगनीज, थायामिन, रिबोफ्लेविन, पायरीडॉक्सिन, कॉपर यांसारखे अनेक सूक्ष्म पोषक घटक आढळतात. ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. यासोबतच कौमेरिक अॕसिड, फेरूलिक अॕसिड, क्लोरोजेनिक अॕसिड, इलाजिक अॕसिड अशी अनेक नैसर्गिक रसायने अननसात आढळतात. जे शरीराला आतून मजबूत बनवण्यास मदत करतात.

*५). रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास होते मदत...*
अननस खाल्ल्यानेही रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त आणि सोडियमचे प्रमाण कमी असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तथापि, जर तुम्ही रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी औषधे घेत असाल, तर हा त्याचा पर्याय नाही आणि ते घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

*६) कर्करोग रोखण्यासाठी उपयुक्त...*
कर्करोग हा एक असा आजार आहे, ज्याचा यशस्वी आणि पूर्णपणे प्रभावी उपचार आजही जगभरातील डॉक्टर शोधत आहेत. तथापि, अननसमध्ये असे अनेक घटक आढळून आले आहेत जे कर्करोगापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहेत. अननसात आढळणारे ब्रोमेलेन हे एन्झाइम शरीरात कर्करोगाच्या पेशी तयार होण्यास प्रतिबंध करते, असे एका संशोधनातून दिसून आले आहे. एवढेच नाही तर ते मृत पेशींना नैसर्गिकरित्या साफ करते. ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.

10/04/2023

रोजच्या आहारात आवळ्याचा समावेश केला तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते !!

आवळा औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. आवळ्यामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आवळा अनेक औषधांमध्ये वापरला जातो. आवळ्यात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आहेत.

त्यात व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर असतात. यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आयर्नसारखे मिनरल्स असतात, जे अनेक रोगांवर फायदेशीर असतात. जर तुम्ही रोजच्या आहारात आवळ्याचा समावेश केला तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. पचन, रोगप्रतिकारशक्ती आणि इंफेक्शनसारख्या समस्यांमध्ये आवळा फायदेशीर ठरतो.

आवळा खाण्याचे फायदे :-

पचन समस्या :
आवळ्याचा आहारात समावेश केल्यास पचनाच्या समस्या दूर होतात. पचन, बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅसची समस्या आवळ्याच्या सेवनाने दूर होते. जर तुम्हाला अन्न पचनास त्रास होत असेल, आतड्याची हालचाल नीट होत नसेल तर आवळ्यानं बनवलेल्या गोष्टींचा तुमच्या आहारात समावेश करा.

प्रतिकारशक्ती वाढवणे :
आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी आहे. आवळ्यापासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. आजारांच्या हंगामात आवळ्याचा आहारात समावेश केल्यास सर्दी सारखे संसर्ग होत नाहीत.

हाडे मजबूत होतात :
आवळा हाडांसाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. आवळ्यामध्ये कॅल्शियम भरपूर असते ज्याचा उपयोग हाडे मजबूत करण्यासाठी होतो. आवळा खाल्ल्यानं ऑस्टिओपोरोसिस, संधिवात आणि सांधेदुखी यांसारख्या हाडांशी संबंधित समस्यांमध्ये त्रास कमी होतो. हाडांचे दुखणे दूर करण्यासाठी आवळ्याचा ज्युस हा रोज सकाळी घ्या.

हृदयासाठी फायदेशीर :
आवळा हृदयाच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे पोषक तत्व हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आवळ्यातील क्रोमियम बीटा हृदयाच्या मज्जातंतूंना ब्लॉकेजपासून वाचवते, ज्यामुळे हृदय चांगले कार्य करते आणि निरोगी राहते.

डोळ्यासाठी फायदेशीर :
आवळा डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आपली नजर चांगली करण्यास मदत करते. आवळ्यापासून बनवलेला मुरंबा, चटणी यासारख्या गोष्टी खाल्ल्यानं चवीसोबतच दृष्टीही वाढते.

मधुमेह :
आवळ्यामध्ये असलेले पोषक तत्व मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते.

संसर्ग होण्यापासून होतो बचाव :
आवळ्यामध्ये असलेले पोषक घटक संसर्ग दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहेत. आवळा बॅक्टेरियाशी लढण्याचे काम करतो. हे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. याच्या सेवनाने सर्दी आणि पोटाच्या संसर्गापासून मुक्ती मिळते.

27/03/2023

मूळव्याध म्हणजे काय, त्यातून कसं बरं व्हायचं

मूळव्याध हा मोठ्या प्रमाणात भारतीय लोकांना होणारा एक आजार आहे. बदलता आहार आणि आपली बदललेली जीवनशैली ही याची मुख्य कारणं आहेत. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार भारतातील एकूण लोकांपैकी 50 टक्के लोकांना त्यांच्या आयुष्यात कधीनाकधी याचा त्रास होतो. यातील 5 टक्के लोकांना याचा त्रास कायमस्वरुपी राहातो.

1. मूळव्याध काय असतो आणि त्याची कारणं काय असतातं?
गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्या सुजल्यावर त्यांचा दाह होतो, त्यांच्यावर अतिरेकी दाब पडल्यावर जळजळ सुरू होते. रक्तवाहिन्या सुजण्याची अनेक कारणं आहेत.

शौचाच्यावेळेस या वाहिन्यांवर वाजवीपेक्षा जास्त ताण येणं, बराच काळ शौचालयात बसणं, बद्धकोष्ठ अशी काही याची कारणं आहेचय तसेच सतत अतिसार होणं, वजन वाढलेलं असणं, आहारात तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर्स कमी असणं, पाणी कमी पिणं, व्यायाम करताना अतिश. जड वजनं उचलणं यामुळे गुदद्वाराजवळील भागावर ताण येतो.

या अशा गोष्टींमुळे मूळव्याध होण्याची शक्यता वाढते. महिलांना गरोदरपणात बद्धकोष्ठ आणि मूळव्याध होण्याची शक्यता वाढते.

2. मूळव्याधाचे प्रकार किती आहेत आणि कोणते?
मूळव्याध हा गुदद्वाराच्या बाहेर असलेला आणि गुदद्वाराच्या आतला. आत असलेला मुळव्याधाचा त्रास कधीतरीच होतो. मात्र या भागावर ताण आल्यास त्रास होतो. सतत ताण वाढत गेल्यास आत असलेले मूळव्याधाचे कोंब बाहेर येतात. बाहेर असलेल्या मुळव्याधामुळे तेथे खाज येणे, रक्त येणे असे त्रास सुरू होतात.
काही रुग्णांच्या तेथिल रक्तवाहिन्या फुगून फुटू शकतात आणि रक्ताची गाठही तयार होते.

3. हा आजार कोणत्या वयोगटातील लोकांना होतो?
हा आजार कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो. परंतु 20 ते 50 या वयोगटातील लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे.साठी आणि सत्तरीमधील लोकांना बद्धकोष्ठाचा त्रास असेल तर त्यांच्यामध्ये मूळव्याधाचा त्रास सुरू होण्याची शक्यता वाढते. लहान मुलांमध्ये हा आजार फारसा आढळत नाही. खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे पौगंडावस्थेतील मुलांना मल साठून राहाणं, शौचाला बराच वेळ लागणं असा त्रास होऊ शकतो.

4. खाण्यापिण्याच्या सवयींमुळे मूळव्याध होतो का?
अर्थात होतो. आजकालच्या खाण्यापिण्याच्या सवयी तसेच जीवनशैली, सवयींमुळे असे आजार होत आहेत. लोक भरपूर पिझ्झा, चिझ, बर्गरसारखं फास्टफूड, मैद्याचे पदार्थ खात आहेत त्यामुळे मूळव्याध होण्याचा धोका वाढतो. तसंच लोक आजकाल भाज्या, फळं कमी खातात, पाणी कमी पितात त्यामुळे त्रास होतो. त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींचा यात मोठी भूमिका आहे.

5. मूळव्याध झालेल्यांनी आहारातील बदलांबद्दल कोणती काळजी घ्यावी?
मूळव्याध सुरुवातीच्या टप्प्यात असतानाच लोकांनी आहारात बदल करावा. मैदा तसेच फास्ट फूड खाणं टाळावं. तसेच मूळव्याध कोणत्याही प्रकारचा असो सकस आहार घेतला पाहिजे.

6. मांसाहार करणाऱ्यांना याबाबतीत कोणता त्रास होतो?
आपण जेव्हा चिकन, मटण, बिफ, पोर्क करी सारखे मांसाहारी पदार्थ खातो तेव्हा ते पचवण्यासाठी आपल्या आतड्यांना जास्त पाण्याची गरज लागते.
जर अधिक प्रमाणात पाणी प्यायले नाही तर मग पचनासंदर्भातील त्रास होऊ शकतो आणि हीच स्थिती कायम राहिली तर मूळव्याध होऊ शकतो. त्यामुळे मांसाहारी लोक असा त्रास असेल तर मासे- अंडी खाऊ शकतात. ते पचवायला तुलनेत सोपं आहे.

7. घरगुती उपायांनी मूळव्याध बरा होतो का?
मूळव्याध सुरुवातीच्या टप्प्यात असतानाच घरगुती उपायांचा उपयोग होतो. फळं, भाज्या खाणं, जिरं घातलेलं पाणी पिणं याचा लाभ होऊ शकतो.

8. ऑपरेशनची गरज कधी लागते?
खाण्यापिण्याच्या सवयी, जीवनशैली बदलूनही तसेच डॉक्टरांनी दिलेली औषधं घेऊनही परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर ऑपरेशन करावं लागतं.

9. मूळव्याधावर उपचार काय आहेत?
सुरुवातीच्या टप्प्यात काही औषधं घेऊन आणि आहार-जीवनशैलीत बदल करुन उपचार करता येतात. पण काहीवेळेस पुढील टप्प्यांतील मुळव्याधावर ऑपरेशन हा एकमेव उपाय उरतो. दीर्घकाळ मूळव्याध असेल तर दररोज शौचाला, खुर्चीत बसण्याला त्रास होतो. रक्तस्राव तसेच मांसल गाठ तयार होणं याचा त्रास होतो. अशा स्थितीत शस्त्रक्रियेमुळे योग्य परिणाम होऊ शकेल. ऑपरेशननंतरही योग्य आहार आणि जीवनशैलीची सवय कायम ठेवावी लागते.

10. मूळव्याधावर कायमचा उपाय काय आहे?
आरोग्यदायी जीवनशैली हाच मूळव्याधावर कायमचा उपाय आहे. काही लोकांना ऑपरेशननंतरही मूळव्याध परतपरत येण्याची शक्याात असते. त्यांनी चांगला आहार व आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब केला पाहिजे

26/03/2023

*तळपायांची, हाताची सतत आग होणे.....*

*कारणे...*
*१)नर्व्हस सिस्टममध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास.
*२)मधुमेहाची शक्यता असल्यास.
*३)व्हिटँमीनबी १२ ची कमी.
*४)उच्चरक्तदाबामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे त्वचेच्या रंगात फरक दिसू लागणे, हात पाय थंड पडणे, या बरोबरच तळपायांची आग होऊ शकते.
*५)लिव्हरशी निगडीत समस्या असल्यास.
*६)थायरॉईड ग्रंथीचे कार्य सामान्य नसल्यास
*७)रक्त वाहिन्यांमध्ये संक्रमण झाल्यास.
*८) तसेच ज्या व्यक्ती एचआयव्ही किंवा कर्करोगासाठी औषधोपचार घेत असतील त्यांच्या बाबतीतही सातत्याने तळपायांची आग होण्याची समस्या आढळून येत असते.
*९)फोलिक अ‍ॅसिड किंवा कॅल्शिअमची कमतरता असेल तर ही समस्या होऊ शकते.
*१०)बध्दकोष्ठाचा त्रास पोटसाफ नसेल तरीही.
*११)मद्यपानाचे व्यसन.
*१२)किडनी संबंधित आजार.
*१३)एखाद्या किटकाचा दंश.

*उपाययोजना...*
*१)गाईच्या दुधापासून बनविल्या गेलेल्या तुपाने तळपायांची मालिश केल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन तळपायांची आग कमी होते.
*२)कैलास जीवन लावून माँलीश केल्यास.
*३)एका मोठ्या टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा कप सैंधव घालावे. या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटे पाय बुडवून ठेवल्याने तळपायांची आग कमी होते, तसेच पायांवर सूज असल्यास ती ही कमी होते.हा उपाय उच्चरक्तदाब, मधुमेह किंवा हृदयाशी निगडीत काही समस्या असणाऱ्या व्यक्तींनी करू नये.
*४)दोन चमचे मोहरीचे तेल व दोन चमचे पाणी एकत्रित करून ते बर्फाच्या तुकड्याने पायाला लावणे.
*५)दोन चमचे अँपलव्हेनिगर गरमपाण्यात घेतल्यास तात्काळ रिझल्ट येतो.
*६)पायाला कोकम तेल लावायच ! हे तेल कोकणात मिळेल, हे तेल मळकट पांढर्या रंगाच असुन , सर्व साधारण
खुप घट्ट असत हे तेल, ह्या तेल खडु पेक्षा जरा जाडसर आकारात उपलब्ध.
*७)कोहळा, पाव किलो साल काढुन,पांढरा दुधी पाव किलो साल काढुन,आवळा गर पाव किलो, आलं १२५ ग्रॅम साल काढुन एकत्रित करून ज्युस करून रोज घेत जा.
*८)शतधौत घ्रुत पायाला लावत जा.
*९)धनेजीरे पाणी पीत जा.

WhatsApp Conversational Marketing Workshop: By The Convert Way 24/03/2023

*गोक्षुरादि गुग्गुळ.....* किडनी.हा फार महत्वाचाशरिरातील अवयव आहे.. विघातक पदार्थ, विषारी घटक काढण्याचं काम किडनी अव्याहतपणे करत असते. पण तरीही कधी तरी तिच्या वर लोड येतं. आणि मग त्रास सुरू होतो..क्रियेटिन लेव्हल वाढते आणि बरेच वेळा रूग्णांना .. डायलिसिस वर ठेवले जाते.... अशा वेळी. . आपल्या.. आयुर्वेदात.. फार अनमोल असे औषध आहे जे या त्रासातून मुक्त करते.
आणि किडनी मजबूत करते. ते आहे..*गोक्षुरादि गुग्गुळ*. गोखरू व गुग्गुळ यांच्या संयोगाने तयार केलं जातं.. आपण बघणार आहोत याचे बहुमोल फायदे...👇मुत्रखडा...हा क्रिस्टल स्वरूपात असतो. जेव्हा हे मोठ्या प्रमाणात वाढतात. तेव्हा असह्य वेदनां होतात. व शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते. अशा वेळी. गोक्षुरादि गुग्गुळ. वरुणादि काढा एकत्र दिल्यास काही दिवसांतच मूतखडे तुटून बाहेर पडतात.

युरिनमध्ये जळजळ, अडथळा येणे, यासाठी. गोक्षुरादि गुग्गुळ द्यावे. याने युरिन साफ होते. व वेदना दूर होतात. युरिक एसिड वाढल्याने सांधेदुखी सुरू होते, एडि, गुडघे, दुखतात. हि वटि जेवणानंतर दोन घ्यावे. आराम पडतो.पुरूषांना नेहमीच.. प्रोस्टेट ग्रंथी चा त्रास होतो.सूज व वेदना होतात. अशा वेळी..गोक्षुरादी गुग्गुळ वटि दोन वेळा जेवणानंतर घ्या. याने आराम मिळतो....हि वटी फक्त. मूत्रविकारा वर काम करत नाही तर, शरिरात वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करते,.
फिस्टुला वर हे उत्तम कार्य करते.स्रियांना मासिक पाळीत होणारे त्रास देखील कमी होतात.....श्वेतप्रदर, आणि संसर्ग याचा त्रास झाल्यास . गोक्षुरादि गुग्गुळ वटि जेवणानंतर दोन गोळ्या द्या.. हळूहळू फरक पडतो. ज्यांना संतति होण्यासाठी अडचणी येतात अशावेळी,ओवुलेशन वाढण्यासाठी
व पुरुषांमधील शुक्राणू वाढण्यासाठी.. रोज.गोक्षुरादि गुग्गुळ वटि जेवणानंतर घ्या... फायदा होतो..



आता आपण बघू या याचे घटक...👇

शुद्ध गुग्गुळ..२८० ग्राम..गोक्षुर..११२० ग्राम.. हिरडे..१००ग्राम..बेहडा..१०० ग्राम.,

आवळा..१०० ग्राम., .. सुंठ..१०० ग्राम..,. पिंपळि..१०० ग्राम., काळे मिरे..१०० ग्राम.
नागरमोथा..१०० ग्राम..
यातिल. महत्वाचे...गोक्षुर.. हे शरिराची सूज व वेदना कमी करते, स्त्रियांच्या. गर्भाशयावर उत्तम कार्य करते. पुरुषांचे शुक्राणू वाढवते,. आवळा हा.पचन चांगले करवतो भूक लागते, बद्धकोष्ठता मंदाग्नी अरुचि होत नाही
हिरडे हे जखम झाली तर सूज उतरते, पाचक आहे, पोट साफ होते,
पिंपळी हि जठरावर चांगले कार्य करते, स्राव तयार करते, व त्यामुळे पचन नीट होते.
बेहडा. हा इम्यून सिस्टीम मजबूत करतो,. सूज कमी करतो, शरिरातील संक्रमण दूर करतो.
सुंठ. हि भूक वाढवते व नवीन रक्त तयार करते, जंतूनाशक आहे, पाचक रस उत्तेजित करते
काळे मिरे.. हे जंतू नाशक आहे,. सूज उतरते, पूरक कार्य करते..
गुग्गुळ. हे अनेक रोगांवर उपयोगी आहे, हे पूरक म्हणून कार्य करते..

तेव्हा अशा प्रकारे हे मौल्यवान आयुर्वेद औषध गरजेनुसार घेतल्यास बरेच आजार बरे होतात...


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺

WhatsApp Conversational Marketing Workshop: By The Convert Way This is "WhatsApp Conversational Marketing Workshop: By The Convert Way" by The Convert Way on Vimeo, the home for high quality videos and the people who…

20/03/2023

🙏आरोग्य प्रभात🙏🌹🌿*
*रोगनिवारणासाठी जलचिकित्सा*

*आजारी पडलो की आपण लगेचच डॉक्टरकडे औषधोपचारासाठी धाव घेतो. अर्थात, काही वेळा घरगुती उपायही त्यावर लागू होतात. आपल्याकडे विविध नैसर्गिक उपायांनी रोगोपचार करण्याची पद्धत ऋषीमुनींच्या काळापासून चालत आलेली आहे. अंघोळ हेदेखील रोगनिवारणाचे साधन होऊ शकते, असा विचार आपण कधी केला आहे का? पण, नेहमीच्या अंघोळीव्यतिरिक्त स्नानाचे विविध प्रकार आहेत. त्याचा प्रभाव लवकर पडतो आणि मोठमोठे रोग त्यामुळे बरे होण्यास मदत होते.*

*व्यक्ती आजारी पडली, की त्यावर औषध घेणे हा उपाय सर्वमान्य आहेच; पण आयुर्वेदात किंवा नैसर्गिक उपचारांमध्ये विविध प्रकारच्या स्नानांचा वापर विकार बरे होण्यासाठी केला जातो. या स्नानांचा लवकर उपयोग होतो आणि मोठ्या आजारांमध्ये किंवा विकारांमध्ये थोड्या काळात त्याचा प्रभाव जाणवतो.*

*कटिस्नान किंवा हिपबाथ ः नावाप्रमाणेच कंबरेइतक्या पाण्यातच हे स्नान करायचे असते. त्यासाठी बाजारात विशिष्ट पद्धतीने टबही मिळतात. या टबचा मागचा भाग खुर्चीप्रमाणे असतो ज्याचा पाठीला आधार मिळतो. हे स्नान करताना रुग्णाला पूर्ण कपडे काढून बसावे लागणार असते. दोन्ही पाय बाहेर असतात आणि केवळ नाभीच्या खालपर्यंतचा म्हणजे कटिप्रदेशापर्यंतचा भागच पाण्यात असतो. पाण्यात बसून हाताने मांड्या, जांघा, कंबर चोळावी. यात व्यक्तीला सहन होईल इतकेच पाणी असावे. रुग्ण जर अशक्त असेल किंवा थंडीचा मोसम असेल, तर कंबरेचा वरचा भाग कांबळ्याने झाकून घ्यावा. सुरुवातीला हे स्नान पाच ते दहा मिनिटेच करावे. त्यानंतर हळूहळू हा कालावधी अर्धा तासापर्यंत वाढवू शकतो.*

*मेरूडदंड स्नान ः अर्थात मणक्यावर पाणी टाकणे. हे स्नान करताना नळाखाली असे बसावे की मणक्यावर नळाची धार सुटेल किंवा दुसर्‍या पद्धतीत टॉवेल पाण्यात भिजवून त्याने मणक्यावर जोर लावून घासले पाहिजे.*

*या दोन्ही स्नानांनंतर शरीराचा काही भाग ओला होतो. तो स्वच्छ कोरडा पुसावा. एकुणात शरीराला उष्णता मिळावी म्हणून काही वेळ फिरावे किंवा हलका व्यायाम करावा किंवा ऋतुमान चांगले असेल तर थोडा वेळ उन्हात उभे राहावे.*

*कटिस्नान ः पोटाच्या काही समस्या जसे पोट जड असणे किंवा बद्धकोष्ठता यामध्ये कटिस्नानाचा उपचार केला जातो. कारण, पोटाच्या समस्येत शरीरातील दोषविकार हे खालच्या बाजूला जमा झालेले असतात. कटिस्नान म्हणजे कंबरेपर्यंतच्या भागावर त्याचे उपचार होतात. पोटाचे दोषविकार दूर होण्यासाठी कटिस्नान केल्याने या भागात चैतन्य येते. त्यामुळे शरीरातील जुना, सडलेला मल सुटण्यास मदत होते. केवळ कटिस्नानाने समस्या सुटणार नसेल किंवा अधिक कठीण अवस्था असेल तर कटिस्नान आणि एनिमा दोन्हीचा प्रयोग एकत्र केला जातो. त्यामुळे शरीरशुद्धी लवकर होते. पुरुष आणि स्त्रिया यांच्यामध्ये अवयवाचा पुढील भाग नाडी परीक्षा विज्ञानातील संपूर्ण स्नायविक नाडी केंद्र म्हणजे नाडी केंद्र मानले गेले आहे. कटिस्नान केल्यामुळे नाडीच्या या केंद्राला शीतलता मिळते. शरीरातील हानिकारक उष्णता शरीराबाहेर टाकून संपूर्ण शरीराला ऊर्जा, स्फूर्ती मिळते. शरीरात जे ज्ञानतंतू असतात, तेही मणक्यांमधून जातात. त्यामुळे मणक्यांवर पाण्याची धार किंवा कापडाच्या पट्टीने थंडावा प्रदान केल्यानंतर मेंदूला आलेली निष्क्रियता दूर होते. ओली चादर गुंडाळण्याचा प्रभाव संपूर्ण शरीरावर पडतो. ताप, गोवर, कांजिण्या, दमा, क्षयरोग, सूज, खाज इत्यादी रोगांवर कटिस्नानाचा सकारात्मक प्रभाव दिसून येतो.*

*वाफेचे स्नान ः थंड आणि गरम पाणी यांचे स्नान करून अनेक विकार दूर करू शकतो, तसेच वाफेचा वापर करूनही अनेक विकार दूर करू शकतो. संपूर्ण शरीरात काही विकार जडला असेल, तर रुग्णाला दोरीने विणलेल्या खाटेवर झोपवतात. मग खाटेखाली उकळत्या पाण्याची तीन पातेली ठेवावीत. रुग्णाच्या अंगावर उबदार मोठे रग किंवा कांबळे अशा प्रकारे टाकावे की संपूर्ण खाट तोंडाचा भाग वगळता झाकली जाईल. जेणेकरून वाफ बाहेर पडू शकणार नाही. असे केल्याने व्यक्तीला खूप घाम येतो आणि घामावाटे अनेक विकार शरीराबाहेर टाकले जातात. त्यामुळे संपूर्ण शरीरात काही विकार उद्भवले असतील, तर त्या दोषांची शुद्धी होते.*

*हे झाले संपूर्ण शरीरासाठीचे; पण एखाद्या अवयवालाच वाफ द्यायची असेल, तर वाफ येणार्‍या भांड्यावर तो अवयव धरावा. वरून एखादे कापड टाकावे जेणेकरून भांडे आणि शरीर झाकले जाईल. जे अवयव असे वाफेवर धरणे शक्य नाही, त्यांना शेक देण्यासाठी अंगावर सुती कापड टाकावे. पाण्यात उबदार किंवा लोकरीचे कापड टाकून पिळून ते वेदना होणार्‍या अवयवावर कपड्यावर ठेवावे. कापड थंड होऊ लागले, की दुसरे कापड पाण्यात पिळून ठेवून वाफ द्यावी. अंगावर आधी सुती कापड टाकल्याने गरम शेक घेताना अंगाला गार हवा लागू नये. तसेच लोकरीचे कापड वापरत असू तर त्याचा थेट त्वचेला चटका बसू शकतो. त्यामुळे सुती कापड त्वचेवर ठेवूनच अशा प्रकारचा शेक द्यायला पाहिजे.*

*या सर्व स्नानांच्या पद्धतीत परिस्थितीनुसार काही बदल करू शकतो; पण रुग्णाच्या दुखर्‍या अवयवाला वाफेने शेकल्यास त्याचे फायदे जरूर होतात. गरम पाण्याचे स्नान, वाफेचे स्नान केल्यानंतर थंड पाण्याने अंघोळ करावी. त्यामुळे रक्ताभिसरणाची गती योग्य राहाते.*

*थंड पाण्याची प्रतिक्रिया ः वरील सर्व प्रकारच्या स्नानांचा फायदा होतो. कारण, थंड पाण्याची प्रतिक्रिया. जेव्हा आपण उघड्या अंगावर पाणी उडवतो तेव्हा शिरशिरी येते आणि अंगावर काटा येतो आणि रक्ताभिसरणाचा वेग वाढतो. अशाच प्रकारे ही विविध स्नाने, पट्ट्या ठेवणे यामध्ये शरीराला थंड पाण्याचा स्पर्श होतो. त्यामुळे पहिले काम होते, ते म्हणजे शरीरातील उष्णता कमी होते. मग उष्णतेची कमतरता पूर्ण करण्यासाठी रक्ताभिसरणाचा वेग त्या दिशेने वाढू लागतो. रक्ताभिसरणाचा वेग वाढल्यानंतर दूषित विजातीय द्रव्य वाहून मलाशयाच्या दिशेने जातात. पाण्याच्या प्रभावामुळे रोगांचे निवारण होते आणि जे अवयव सुस्तावलेले तसेच शक्तीहीन होतात, त्यांना नवी ऊर्जा मिळते.*

*बहुतांश रोगांचे मूळ हे पोटाच्या आरोग्याशी निगडित असते. बद्धकोष्ठता, जड पोट हे अनेक विकारांचे मूळ आहे. त्यामुळे पोटाच्या खालच्या भागातच दोषांचे मूळ असते. कटिस्नान केल्याने पोटाचा हा खालचा भाग उत्तेजित होतो किंवा त्याला ऊर्जा मिळते. त्यामुळे जुनाट आणि कुजलेला मळ बाहेर पडण्यास मदत होते.*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

18/03/2023

*👉माका (भुंगराज)*

भृंगराज ह्यालाच मराठी मध्ये माका असे ही म्हटले जाते. अहं आपण खातो तो मका नव्हे बरं का!हा माका आहे माका. ह्याचे बहुवर्षायू अर्थात बरीच वर्षे जाणारे क्षुप असते.

औषधी करिता उपयुक्त म्हणून ह्याचे पंचांग व बीज वापरले जाते. हा चवीला कडू, तिखट, उष्ण असतो व जड आणी रूक्ष देखील असतो. शरीरातील कफ व वात दोषांचे हा शमन करतो.

आता ह्याच माक्याचा उपयोग आपण कुठल्या शारीरिक तक्रारींमध्ये करू शकतो ते पाहुयात :

जखम झाली असल्यास किंवा जखमेचा व्रण राहिला असल्यास, तसेच सुजेवर माक्याचा लेप लावला जातो..

केसांवर तर ह्याचा खास उपयोग होतो केस गळणे, कोंडा ह्यात माका सिध्द तेल डोक्यावर लावतात. तर केस काळे भोर होण्यास पाने वाटून लेप लावतात. आपण सर्वांना महाभृंगराज तेल माहीतीचे असेलच ह्यात हा माकाच तर असतो.

जरा न येता पुष्कळ दिवस जगण्यासाठी व केस काळे राहण्यासाठी पुष्य नक्षत्री माक्याची झाडे उपटून आणून स्वच्छ धुऊन मुळे वेगळी करावी व झाड वेगळे कराय यांना सावलीत दोन दिवस व उन्हात दोन दिवस वाळवून वेगवेगळे खलबत्यात कुटून वस्त्रगाळ चूर्ण करावे.

पुष्य नक्षत्री मुळीचे चूर्ण १ तोळा भाताच्या पेजेतून घ्यावे व दररोज फांद्याचे चूर्ण १ तोळा तिळ तेल २० मिली यातून घ्यावे. असे १ वर्ष घ्यावे किंवा ३ महिने घ्यावे.

माक्याचा रस चाई, टक्कल किंवा केस काळे करायचे आहे यासाठी आगोदर डोक्याचे सर्व केस काढून नंतर माक्याचा रस चोळावा व पोटात पण पंचवीस मिली घ्यावा किंवा माका चुर्ण एक चमचा व काळे तिळ एक चमचा असे खाऊ शकतो फक्त अट एवढीच आहे की २१ ते ४१ दिवस दुध भात हेच अन्न खाऊन राहायचे.

महिलांनी एक ली. भृंगराज रस व एक ली. खोबरेल तेलात शिजवून थंड करून गाळून डोक्यास लावावे. केस गळणे, पिकणे, टक्कल पडणे ह्या समस्या जातात.

माका रस व दुध भात यावर ४१ दिवस काढले तर शरीर रोगमुक्त होऊन तारुण्य मिळते, कायापालट होते.

आवळा चूर्णाला माक्याच्या रसाच्या सात भावना देऊन सावलीत वाळवून दररोज एक चमचा मधासोबत जो एक वर्ष खाईल त्यांना काय फायदे होतील ते आम्हांस कळवणे. सर्व रोग जाऊन निरोगी जीवन होईल.

दाढ दुखत आहे तिच्या विरुद्ध कानात माका रस थोडा गरम करून चार थेंब टाकावा दाढ दुखी राहते.

भंगदरावर माक्याची चटणी बांधत जावी भंगदर बरा होतो. कानातील नाद, गोम, गोमाशी, किडा, मुंगी जाणे यावर माका रस कानात घालावा किंवा साधे मिठाचे पाणी घालावे. कावीळात दोन्ही वेळा दोन चमचा माका रस दररोज ७दिवस पाजावा, तेलकट वर्ज..

बटाटा मका पावडर 5 ग्रॅम तिळाचे तेल आणि 4 चमचे घ्या. गंध वाता, अर्ध डोके दुखी येत माका रस नकात चार पाण्याचा एक थेंब घ्या, तो सुगंध समजण्यासाठी खर्च येतो. तीन ते सात दिवस. रेल कान फुटल्यास, तुळस आणि माका रास, दोन्ही थेंब थोडे मऊ करून कानत टाकवा.

अर्ध डोके दुखीमध्ये माका रसात मिरे पावडर घालून मस्तकी लेप द्यावा.

डुक्कर दास माका व हळद पाण्यासोबत वाढून प नाळगुदास शरीरावर किंवा चेह-यावर अचानक सुन येते त्यावर माका १ तोळा पाला व पाच लसून पाकळी

गोळी कुटून खावी असे ३ दिवस खावे स-दुखा कोणत्याही दुखणा या भागावर पाला चटणी चोळावी
चावा, जखम, इसब, खरुज, कोड, बात, हे बरे होतात. + उच्च रक्तदाब याच्या रसाने सामान्य होतो दोन चमचा रस दररोज साठ ते नव्वद दिवस घ्यावा.

वाताची मुळव्याध माका पाने नव्वद ग्रॅम व मिरी वस्त्राव पावडर दहा ग्रॅम एकत्र कुटून वटाण्यासारख्या मो करून शिळ्या पाण्यासोबत एक गोळी घ्यावी व कोंबावर पण पाण्यात उगाळून लावावी.

मुले, महिला माती खात असतील तर स.-दु- स. एक- एक चमचा माका रस द्यावा माती खाणे विसरून जातात.

पुरुषांनी डोक्यासाठी माकारस तीळ तेलात सिद्ध करून वापरणे व दररोज रात्री झोपतांना हे तेल लावावे.
*--------------------------------*

17/03/2023

*नखांमध्ये आणि केसात होणारे ‘हे’ बदल थायरॉईड आजाराचे संकेत असू शकतात; ‘ही’ लक्षणे दिसतात वेळीच सावध व्हा.....*

जगभरात थायरॉईड हा आजार सामान्य बनत चालला आहे. हा एक असा आजार आहे ज्यामध्ये शरीरात आयोडीनची कमतरता असते. भारतातही थायरॉईडच्या आजाराचे निदान झालेल्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. भारतात अंदाजे ३२ टक्के लोकं थायरॉईडच्या विविध प्रकारच्या विकारांनी ग्रस्त आहेत. थायरॉईड हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. तसंच भारतीय थायरॉईड सोसायटीने केलेल्या सर्वेक्षणानुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हायपोथायरॉईडीझमचे प्रमाण अधिक आहे.

थायरॉईड ग्रंथी मानेच्या तळाशी असतात आणि शरीरातील चयापचय नियंत्रित करणारे हार्मोन्स तयार करतात. थायरॉईड ग्रंथी कमी सक्रिय झाल्यामुळे हायपोथायरॉईडीझम होतो, तर थायरॉईड संप्रेरकाच्या अतिउत्पादनामुळे हायपरथायरॉईडीझम होऊ शकतो.

परंतु, थायरॉईड आजार नेमका कशामुळे होतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

“थायरॉईड रोगाचे निदान झालेल्या लोकांना आयुष्यभर औषधोपचार करण्यास सांगितले जाते” असे स्मृती कोचर (gut health expert) यांनी इंस्टाग्रामवर सांगितले आहे. त्या पुढे असंही म्हणाल्या की, जर तुम्हाला तुमचे शरीर कसे कार्य करते आणि तुमच्या बायोकेमिस्ट्रीमागील विज्ञान समजले तर, थायरॉईड आजारासह बर्‍याच समस्या वेळीच दूर होऊ शकतात.

*थायरॉईड आजाराची लक्षणे...*
थायरॉईड आजार झाल्यास शरीरात अनेक लक्षणे दिसू शकतात जसे की...
*वजन वाढणे,
*थकवा,
*बद्धकोष्ठता,
*चिडचिड,
*केस कोरडे होणे किंवा पातळ होणे,
*भुवया विरळ डोळे,
*नखे ठिसूळ डोळे,
*निद्रानाश.
तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास, ताबडतोब TSH (thyroid stimulating hormone) चाचणी, छातीचा एक्स-रे, T4 किंवा थायरॉक्सिन चाचणी करा.

*उपचार...*
हायपरथायरॉईडीझमवर अनेक प्रकारे उपचार केले जाऊ शकतात. तथापि, डॉ गुप्ता यांनी स्पष्ट केले की हायपरथायरॉईडीझमचे मूळ कारण, रुग्णाचे वय, थायरॉईड ग्रंथीचा आकार यासारख्या अनेक बदलांच्या आधारावर उपचार केले जाऊ शकतात. तुम्हाला हायपोथायरॉईडीझम असल्याचे आढळल्यास, थायरॉईड संप्रेरक बदलणे फायद्याचे ठरू शकते. औषधोपचाराने तुमची थायरॉईड संप्रेरक पातळी सामान्य होण्यासाठी जवळपास १ ते २ महिने लागू शकतात. औषधोपचार सुरू केल्यावर, तुमची TSH पातळी सामान्य श्रेणीत असल्याची खात्री करण्यासाठी तुम्ही ते तपासले पाहिजे. तुम्हाला दर ६ महिन्यांनी तुमची थायरॉईड टेस्ट करणे गरजेचे आहे.

16/03/2023

*आवळा खाल्ल्याने कमी होते बॅड कोलेस्टेरॉल? हे पदार्थ हाय कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आहेत उत्तम.....*

आपल्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी कोलेस्टेरॉल आवश्यक आहे. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते. गुड कोलेस्टेरॉल आणि बॅड कोलेस्टेरॉल यांचा शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होऊ शकतो. कोलेस्टेरॉल वाढणे हा आजकाल एक सामान्य आजार आहे, ज्यामुळे बहुतेक लोक त्रस्त आहेत. बॅड कोलेस्टेरॉल म्हणजेच LDL शरीरातील रक्तवाहिन्यांवर चरबीप्रमाणे जमा होते. ज्यामुळे रक्ताभिसरणावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे हृदयविकाराच्या झटक्यासारखी गंभीर आणि जीवघेणी परिस्थिती उद्भवू शकते.

शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आहार म्हणजे आपण कोणता आहार घेतो. तज्ज्ञांच्या मते, आहारात बदल करून बॅड कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे काहीही खाण्यापूर्वी त्याचे शरीरावर होणारे परिणाम माहित असणे गरजेचे आहे. आज आपण जाणून घेणार आहोत आवळा बॅड कोलेस्टेरॉल कमी करू शकतो का..?

*आवळा बॅड कोलेस्टेरॉल कमी करू शकतो...?*
*एनसीबीआयच्या अहवालानुसार, उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येमध्ये आवळा खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होते. आवळ्याचे सेवन शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल एलडीएल कमी करून गुड कोलेस्टेरॉल एचडीएलची पातळी वाढविण्यात मदत करते.

*आवळ्याच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण आणि रक्तदाब सुरळीत राहतो, ज्यामुळे शरीरातील अनेक हृदयविकारांचा धोका कमी होतो. तुम्ही आवळ्याचा रस पिऊ शकता किंवा कोणत्याही प्रकारे आवळा खाऊ शकता. आवळा पावडर पाण्यात घालून पिऊ शकता. आवळा रक्तातून चरबी काढून पातळ करण्याचे काम कारण्यासोबतच शरीराच्या एकूण आरोग्यासाठी उत्तम अन्न आहे. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलही कमी होते.

*लसूण...*
हेल्थ लाइननुसार, उच्च कोलेस्ट्रॉलमध्ये लसणाचे सेवन अपेक्षेपेक्षा जास्त फायदेशीर आहे. लसूण रक्ताभिसरण सुधारण्यासोबतच शरीरातील गुड कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्याचे काम करते.

*लाल यीस्ट तांदूळ...*
सामान्य पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत लाल यीस्ट तांदूळ म्हणजेच रेड ईस्ट राईस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करून गुड कोलेस्टेरॉल वाढवण्यास मदत करते.

15/03/2023

*👉तुळस*

*शास्त्रीय नाव: Ocimum sanctum, ऑसिमम सँक्टम;*

*आशिया, युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात.* *तुळशीची रोपे सर्वसाधारणतः ३० ते १२० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात.*
*हिची पाने लंबगोलाकार, किंचित टोकदार व कातरलेली आणि एकाआड एक असतात. तुळशीच्या तुर्‍यासारख्या फुलानां मंजिरी म्हणतात.त्यांतूनच तुळशीच्या बिया मिळतात.*

*नैसर्गिक उपायाने दूर करा ताण-तणाव*

*भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला अत्यंत मानाचे आणि पवित्र स्थान दिले आहे. अनेक व्याधी आणि समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आयुर्वेदामध्ये तुळशीचा वापर सांगितला आहे. त्यातील आरोग्यदायी घटक मन शांत करण्यासाठी तसेच ताण-तणाव कमी करण्यास मदत करतात.*

*तुळशीमध्ये शरीरातील स्ट्रेस हार्मोन (कॉर्टिसोल) नियंत्रित करण्याची क्षमता आहे. ताण -तणावामुळे मेंदूचे होणारे नुकसान टाळण्यासही मदत होते. तुळशीच्या पानांमध्ये अ‍ॅन्टिऑक्सिडंट्सचा मुबलक साठा आढळतो. परिणामी शरिरातील फ्री रॅडिकल्सचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य राखण्यास मदत होते.*
*तुळशीमध्ये अ‍ॅडप्टोजेनिक क्षमता असते. त्यामुळे रक्ताभिसरणाच्या कार्यात सुधारणा होते. नर्व्हस शांत होतात. परिणामी ताण कमी होण्यास मदत होते. शरीरात ताणतणावामुळे वाढलेले ऑक्सिडेशन कमी होते. हळूहळू ताणतणावाचा शरीरावर होणारा दुष्परिणाम रोखण्यासही मदत होते.*

*तुळशीचा काढा किंवा चहामध्ये तुळशीची पानं मिसळून उकळल्यास दिवसभरातील थकवा आणि ताण कमी होण्यास मदत होते.*

*तुळस पाने सावलीत वाळवून वस्त्रगाळ चूर्ण करून पाच ग्रॅमच्या डब्या भराव्यात व नसच्या जागी सर्वांना द्याव्यात तुळस पावडर नाकात ओढल्याने अर्ध डोके दुखी, लकवा, सर्दी, दमा, कफ, नाकातील हाड वाढणे कमी होते.*

*देवी रोग साथ गावात येताच घरात, गावात प्रत्येक व्यक्तीला खडीसाखर, तुळसीचा रस पाणी टाकून दररोज ७ दिवस घेण्यास सांगावा.*

*वात संधीवात, आमवात यासाठी तुळस रस चार चमचा, गुळ ५ ग्रॅम, मीरी पावडर २ ग्रॅम, सुंठ पावडर २ ग्रॅम, तुप २ चमचा असे मिसळून खावे ६० ते ९० दिवस घ्यावे.*

*नियमित न चुकता निरोगी राहण्यासाठी दररोज सकाळी उपाशी पोटी तुळस रस पांच थेंब अर्धी वाटी पाण्यात घ्यावा. + तुळस, आद्रक यांचा रस एक-एक लिटर खडीसाखर पाक एक तारी एक लीटर परत शिजवून एक तारी करून भरणीत थंड करून भरून ठेवावा उपयोग सर्दी, खोकला, ताप व निरोगी शरीरसाठी दररोज एक चमचा खावे.*

*तुळस पानाचा रस डोक्याचे केस काढून लावल्याने व अंगठी किंवा सोन्याने हळुहळू घासावे असे केल्याने नविन केस येतात हे टक्कलासाठी आहे.*

*बुद्धी वाढीसाठी तुळस रस एक चमचा अर्धीवाटी पाणी मिरेपावडर वस्त्रगाळ दोन चिमुट मुलांना एक चिमुट खडी साखर पावडर एक चमचा असे एकवीस ते नव्वद दिवस घेणे. बुद्धीत वाढ होते. वेडा, मीर्गी, कॅन्सर, एड्स, वात, पित्त, कफ, हे विकार जाऊन शरीर निरोगी राहाते.*

*त्वचा विकार, रिंग, वात, खाज, लखवा, अर्धांगवायु,कोड, मुळव्याध, इसब, मुरुम यावर तुळस पाने चटणी लावावी.*

*समान मात्रेत तुळस रस व खोबरेल तेल सिद्ध करून थंड करून गाळून ठेवावे. डोक्यांच्या केसासांठी, उवा, कोंडा, फोड, केस गळणे, पिकणे रात्री झोपतांना लावावे.*

*तिळ किंवा सरसो तेलात तुळस रस सिद्ध करून मालीश,खाज, इसब, वात, संधीवात यावर गुणकारी. * तुळस अंगणात, दारात, छतावर, कुंडीत, शेतात, खिडकीत अशी सर्वांनी लावली पाहिजेत. कारण ऑक्सिजन आहे, नाहीतर आहे हिंदुची म्हणून ऑक्सिजन पासून व औषधीय महासागरापासून वंचीत राहताल व दुख भोगावे लागेल.*

*तुळसीची माळ सर्वांनी गळ्यात घातली पाहिजेत. कफ वाढू देत नाही, बाहेर बाधा होऊ देत नाही. अनेक वायरसपासून आपले संरक्षण करते.*

*तुळस भगवंताची प्रिय* *असल्यामुळे आपलीही प्रिय*
*असली पाहिजेत.दिवसा तुळस रस थोडा कोमट करून कानात दोन थेंब टाकून पाच मिनिट थांबावे परत दुसऱ्या कानात रस टाकावा ह्याने पु येणे, कमी आयकायला येणे, आवाज होणे,असे कानाचे सर्व विकार राहतात.*

*अर्धांग वायू वर अर्धी वाटी गाईचे दही व अर्धी वाटी तुळस पाने चटणी व ५ ग्रॅम सैंधव मिठ अर्धांगावर लेप. द्यावा खुप फरक पडतो व लसून पाकळी खात जावी.*

*अर्धीवाटी गाईचे दही त्यात चार चमचा तुळस रस व दोन चिमुट मिरेपावडर टाकून घेतल्यास कॅन्सर, एड्स, सर्दी, खोकला बरे होतात.*

*सर्दी, खोकला, ताप, वात, कोणती साथ आली तर तुळस, सुंठ मिरे, खडीसाखर यांचा काढा ३ वेळा ३ दिवस घ्यावा. तुळस पंचाग काढा दर आठ दिवसांनी एकदा अवश्य घ्यावा निरोगी राहाल. दाढ दुखीत तुळस व कापुर कुटून दाढेत ठेवावा.वाढू देत नाही, बाहेर बाधा होऊ देत नाही. अनेक वायरसपासून आपले संरक्षण करते.. * तुळस भगवंताची प्रिय असल्यामुळे आपलीही प्रिय असली पाहिजेत.*

*दिवसा तुळस रस थोडा कोमट करून कानात दोन थेंब टाकून पाच मिनिट थांबावे परत दुसऱ्या कानात रस टाकावा ह्याने पु येणे, कमी आयकायला येणे, आवाज होणे, असे कानाचे सर्व विकार राहतात.*

*अर्धांग वायू वर अर्धी वाटी गाईचे दही व अर्धी वाटी तुळस पाने चटणी व ५ ग्रॅम सैंधव मिठ अर्धांगावर लेप. द्यावा खुप फरक पडतो व लसून पाकळी खात जावी.*

*अर्धीवाटी गाईचे दही त्यात चार चमचा तुळस रस व दोन चिमुट मिरेपावडर टाकून घेतल्यास कॅन्सर, एड्स, सर्दी, खोकला बरे होतात.*

*सर्दी, खोकला, ताप, वात, कोणती साथ आली तर तुळस, सुंठ मिरे, खडीसाखर यांचा काढा ३ वेळा ३ दिवस घ्यावा.*

*तुळस पंचाग काढा दर आठ दिवसांनी एकदा अवश्य घ्यावा निरोगी राहाल..*

*दाढ दुखीत तुळस व कापुर कुटून दाढेत ठेवावा.*
*--------------------------------*
*!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!​*
*--------------------------------*
*सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामया|*
*सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद दुःख भागभवेत्||*
*--------------------------------*

Want your business to be the top-listed Beauty Salon in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Bhosale Park , Kadamwadi
Kolhapur
416003

Other Kolhapur beauty salons (show all)
Aarany parlour Aarany parlour
Harley High School
Kolhapur, 416005

Hii Hii
Kolhapur, 416002

Pamper Me Pamper Me
Kolhapur, 416008

PANAH Herbals PANAH Herbals
Kolhapur, 416003KOLHAPUR

Natural and effective remedial solutions for all your hair problems

Nutan Fragrance Nutan Fragrance
Shiroli Pulachi, Yadavwadi
Kolhapur, 416122

We are the manufacturer of all types of incense sticks(Agarbatti).

Kolhapur Sangli Ratnagiri call girl_s es**rt service Kolhapur Sangli Ratnagiri call girl_s es**rt service
Sangli Ratnagiri
Kolhapur

Best high profile full safe and secure 100% real genuine 24/7 available

Rock viki Rock viki
Kolhapur

this is official page

Mint cuts Mint cuts
Kolhapur, 416003

Skin & Hair treatments. Beauty and Much more...

Armaa Armaa
Infinity Complex, Flat No S1, 2nd Floor, Near Dhairya Prasad Hall, India.
Kolhapur, 416003

Carefully curated and handmade beauty/skincare products

Mona's Health and Beauty corner Mona's Health and Beauty corner
Kolhapur, 416003

Health and beauty related posts in this group .

Sabhyata - better ways to ease life Sabhyata - better ways to ease life
Shop No 15, Nikam Park, Deokar Panand, Kolhapur
Kolhapur, 416012

We trade in a wide range of hygienic products like Sanitary Napkins, Sanitary Napkin Vending Machine